मूल्याधारित शांती शिक्षण ही समाज, राष्ट्र आणि विश्वाची गरज – आचार्य लोकेश
संभाजीनगर/नवी दिल्ली | SDNA
अहिंसा विश्व भारती आणि विश्व शांती केंद्राचे संस्थापक, प्रसिद्ध जैन संत आणि विश्व शांतिदूत आचार्य लोकेशजी यांनी छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंग मंदिर, उस्मानपुरा येथे **”पीस एज्युकेशन सीरिज”**चा शुभारंभ केला. अमेरिकेतील यशस्वी शांती आणि सद्भावना यात्रेनंतर महाराष्ट्रातील त्यांच्या पहिल्या कार्यक्रमात त्यांचे भव्य आणि आत्मीय स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रेरणादायी मार्गदर्शन करताना आचार्य लोकेशजी म्हणाले की, “शांती शिक्षण हा केवळ एक विषय नसून जीवन जगण्याची कला आहे.” याचा उद्देश असे जागरूक नागरिक घडवणे आहे, जे स्वतः शांततापूर्ण जीवन जगतील आणि समाजात सद्भाव, संवाद व सहकार्याची संस्कृती मजबूत करतील.
आज जगासमोर असलेल्या विविध आव्हानांवर कायमस्वरूपी उपाय केवळ शिक्षण, नैतिक मूल्ये आणि अहिंसेच्या मार्गानेच शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. भारताची प्राचीन आध्यात्मिक परंपरा “वसुधैव कुटुंबकम्” आणि “सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः” या संदेशातून संपूर्ण मानवतेला एक कुटुंब मानण्याची प्रेरणा देत आली आहे. विकसित भारत आणि शांततापूर्ण विश्वाच्या निर्मितीसाठी युवकांना या जीवनमूल्यांशी जोडणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकमत मीडिया समूहाचे एडिटर-इन-चीफ डॉ. राजेंद्र दर्डा यांनी आचार्य लोकेशजी यांच्या मानवतावादी कार्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, आजच्या काळात शांती, नैतिकता आणि मानवी मूल्यांवर आधारित शिक्षणाची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे.
“पीस एज्युकेशन सीरिज” ही दूरदर्शी आणि काळानुरूप उपक्रम असल्याचे सांगत डॉ. दर्डा यांनी हा अभियान युवकांना सकारात्मक विचार, सामाजिक जबाबदारी आणि जागतिक नागरिकत्वाच्या दिशेने प्रेरणा देईल, असे मत व्यक्त केले.
अहिंसा विश्व भारती आणि निर्मल जीवन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात उपस्थित युवकांनी व्यसनमुक्त, हिंसामुक्त आणि सद्भावपूर्ण समाज निर्मितीचा संकल्प केला. आचार्य लोकेशजी यांनी प्रत्येकाने आपल्या कुटुंबात, शैक्षणिक संस्थांमध्ये आणि समाजात शांती व मानवी मूल्यांचे वाहक बनण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनीही “पीस एज्युकेशन सीरिज”चे कौतुक करत हा उपक्रम सामाजिक परिवर्तन, सामाजिक समरसता आणि विश्व बंधुत्व मजबूत करणारा प्रभावी अभियान असल्याचे सांगितले.
कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आचार्य लोकेशजी म्हणाले की, अहिंसा विश्व भारतीचे उद्दिष्ट शांती शिक्षण जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून देशभरातील युवकांमध्ये नैतिक मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि मानवी संवेदनांचा विस्तार होईल, ज्यामुळे विकसित भारताच्या निर्मितीसोबतच विश्व शांतीसाठीही मोठे योगदान मिळेल.
या कार्यक्रमात निर्मल जीवन फाउंडेशनचे डॉ. विशाल लाडनिया आणि प्रेरणादायी वक्ते साजन शाह यांनी प्रारंभी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने युवक, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, विविध धार्मिक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच मान्यवर नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा उद्देश युवकांमध्ये शांती, अहिंसा, करुणा, सहिष्णुता, संवाद आणि मानवी मूल्यांवर आधारित जीवनदृष्टी विकसित करणे तसेच त्यांना राष्ट्रनिर्माण आणि विश्व शांतीसाठी प्रेरित करणे हा होता.